१४ ऑक्टोबर २०१२

डुबुकवड्यांची मसालेदार आमटी!







लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
गरम मसाला असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
क्रमवार पाककृती: 
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा
कोन गाव परनाले जाशी वं मन्हा रसिक राजा ||
काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
घड्याळ बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सानं घड्याळ न कस्सानं काय
डेडोर ( बेडुक??) बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा....

काय बांधी उना व मन्हा रसिक राजा
पोयतं बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न पोयत न कस्स न काय
नाडा बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मन्हा रसिक राजा...

काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
बाशिंग बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न बाशिंग नि कस्सा न काय
सुपडं बांधी उना व मना रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मना रसिक राजा

- अहिराणी साहित्य

परना - लग्न

अहिराणी गाना - मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

आंग्या पांग्या ना संसार नही कराव माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

मी ते शेतकरी नवरा नई कराव माय
यान्हा पायल्या ना भाकरी कोन करी माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं पोलीस भरतार नइ कराव माय
यान्हा पट्टानी पालीस ( पॉलिश) कोन कराव माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं मास्तर भरतार नही कराव माय
यान्हा पगारना नोटा कोन मोजी माय
मी ते घागर धरी धरी...!

मी तं साह्येब भरतार करसु वं माय
त्यान्हा गयामां हात घाली फिरसु वं माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय!

- अहिराणी साहित्य 

अहिराणीतील खमंग संवाद!

अहिराणीतील खमंग संवादः
नुकतेच 'मराठी दिनानिमित्त' मायबोली या वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.

 प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे.

त्यातली ही माझी एन्ट्री:

नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी? तिले जास्त टाईम लागस नट्टापट्टाले! काम नैन धाम नै... नुसता नखराच दखा नटमोगरीना!

मोठी जाऊ(नवरीना 'माय'ले): का वं इजु? नवरदेवले ववाळाले ताट लिधं का? त्या मां तुपना दिव्वा लावाले इसरु नकोस बर्का! आन आक्पेटी नेमबंद ठी दे नैतं इसरी जाशी...अन मग तथा बोंब! तुले म्हाईत शे ना 'धल्ला' (धडला- म्हातारा) ना स्वभाव! आन जवाईले ववाळशी तव्हय डोक्यावर पदर घे जो!

नवरीनी मायः हां वं बाई! माले म्हाईत शे ना! ह्ये का पह्यलं लगन शे आपल्या घरमां...

एक करवली (मुसमुसत): वं माय मी आते काय करु? मन्ही नथ नई सापडी राह्यनी! कालदिन देव आणाले गयथु तव्हय तं व्हती नाकमां …
 

१८ मे २०१२

अहिराणी लोककथा - लक्षुमी आन अवदसा

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.
लक्षुमीनं घर मोठं-शिरीमंत, एकत्र कुटुंब. मोठी शेतीवाडी, डाळिंबना बागं आन द्राक्षास्ना मळा. रामपारात उठीसन लक्षुमी कामले लागे. दारना आडे ठेयेल कुंचा काढीसन सरं घर झाडे. आंगनमा सडारांगोळी काढे. मंग सरास्ले न्ह्यारी आन पोर्‍यास्नी तयारी. मंग दुपारनं जेवण. मंग धान्य पाखडनं, निवडनं, सुनं. मंग सैसानले दळा-भयडाना-पाखडाना कामं. रातना सयपाक लगेच सुरू. रातपावत बिचारी दमे जाये. हाई सरं सासू-सासरा, देर-ननंदा, नवरा-सालदारं-गडीमान्सं.. सरास्ले समजे. घरनास्ना दोन गोड शब्द मिळनात, नवराकडतीन गोड इचारपूस व्हयनी, का मंग तिले कयेल कामनं काईच वाटेना. शांत झोप लागनी, का मंग दुसरा दिवस रामपारात उठाले बळ येये. इतला मानसं र्‍हाईसनबी या घरात भांडन-कजा व्हयेना. सरा आनंदीआनंद आन गोकूळनं राज्य.

 अवदसानं सरंच उलटपाल्टं. कासराभर ऊन येयेस्तोवर झोपी र्‍हाये. काम करानी सवयच नव्हती. आन गंदाबुरा विचारस्मातून सवडबी नव्हती तिले. कुंचाबी हातमा धरता येयेना, ते काम कसाले सांगी कोन..? चुकीमाकी कोनी सांगंच, ते वाचाळ तोंड करे सर्रास्वर. तिले घाबरीसन कटकट नको, म्हनीसन सरा लोक आपापला कामं करी लेयेत. पन इतलं राबीसनबी त्यास्ले मळा फळेना, खडकू मिळनात.
लक्षुमीना घर पैसास्ना पाऊस, आन लक्षुमी दागिनास्नी मढेल. अवदसाले हाई काई बरं वाटेना. दिनभर लक्षुमीवर जळी र्‍हाये. डोकं चालाडी पार थकी गयी ती, पन यावर तिले इलाज सापडेना.
अवदसानासारखीच तिनी ननींद. एक दिन ननींद तिले बोलनी- लक्षुमीना घरमा भांडनकजा घालूत. हाऊ एकच रस्ता शे घर बिगाडाना. तिना घरमा घुसानं सादंसोपं नई. त्यानाकरता एक काम तुले करणं पडी. नीट आयक. लक्षुमीना घरना कुंचा कायम दरूजाना आड दडेल र्‍हास. तो कुंचा जवळ बाहेर पडेल दखायना, तवळ त्यावात तू जाय. आन सरं घर झाडीसन त्यास्ले उलटंपालटं करी टाक. तिना घरमा घुसाना, घरना पूरा बारा वाजाडाना हाऊ एकच रस्ता शे.

बहिणाबाई

बहिणाई

 

 “माझी माय सरसोती, मले शिकवते बोली”

“स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे…
जुने पणास त्याजिता, वसुंधरा नवी कळा
मनामनात आगळ्या नवीनता समावुदे !!
दिवाकरा, मिषे तुझीच दिव्य दर्शने किती
कणाकणातली श्रुती जनाजनात ते नेऊ दे !!
नभी दयार्द्रता तुझी. धरेत नित्य पाझरे
परात्परा असाच रे, झरा अखंड वाहू दे !!

किती साधे शब्द, किती साधी रचना.. पण चराचराचं कल्याण मागणारी रचना ! जणू ज्ञानदेवाने मागितलेल्या पसायदानाचा उत्तरार्धच ! साधेपणा या माणसाच्या लेखनातच नव्हे तर स्वभावातही काठोकाठ भरलेला होता. कुठून आला असेल हा विलक्षण साधेपणा, ही विलक्षण प्रतिभा या माणसामध्ये!

अहिराणी गाना - बोली मनी अहिराणी

बोली मनी अहिराणी,

जशी दहिमान लोणी


सगया ताकना पारखी,


इले पारख नही कोणी


बोली मनी अहिराणी,


जशी दहिमान लोणी 


पंढरपुरले बाई वैसाले माली इस


हाथ मना पुरेना इठूला खाल बस  


- अहिराणी साहित्य


१७ मे २०१२

कानुबाई पिवळा पीतांबर नेसणी ओ माय!


श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

१६ मे २०१२

अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह!!!

जात्यावरल्या अहिराणी भाषेतील ओव्यांचा खजिना आज तुमच्यापुढे खुला करत आहे. खरतर सुमारे २ वर्षापुर्वीच हा माझ्या हाती आला होता. हे मला ज्यांच्याकडुन मिळाले त्यांच्यापैकी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी आत्या विमलबाई दुसाने या आता हयात नाही (जाने.२०११ मधेच त्यांचे निधन झाले) दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे मला इथे मांडता आलं नाही....काही काही सल आयुष्यभर रहातात. हेच खरं अरेरे .. तरीसुद्धा ही त्यांना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली. दुस-या म्हणजे माझ्या मोठ्या काकु प्रमिला वानखेडे आणि माझी आई विजया वानखेडे यांच्या पाठगुळी बसुन मी हे सगळं लिहुन घेतले होते. त्यांचीही मी ऋणी आहे.

त्यांच्याकडुन जी माहिती प्राप्त झाली ती याप्रमाणे:
पुर्वी लहानपणीच मुला-मुलींची लग्न होत असल्याने सासु-सुन किंवा सासुरवास अशा गोष्टी या ओव्यांमधुन दिसत नाही. हं...मधुनच जावा-जावांचे खटके किंवा नणंद-भावजयांचे टोमणे जाणवतात. माझी आई तर नेहमी म्हणे : अगं आधी आईच्या हाताखाली सुन म्हणुन रहावं लागतं नंतर सासुच्या! पहाटे नणंद भावजयी दोघींनाही पहाटे उठुन जात्यावर ४-४ शेराचं (म्हणजे ८ किलो/पायलीभर) दळण करावं लागे. आधी घट्याची/ जात्याची हळद-कुंकु वाहुन पुजा करण्यात येइ. एवढं दळण दळतांना गाण्यात येणा-या ओव्यांमधे काही परंपरागत तर काही लगेच सुचलेल्या ओव्यांचा समावेश असे. मग त्यात नणंद-भावजयींचे खटके असो, त्या त्या काळातली परिस्थिती असो, माहेरासारखा जिव्हाळ्याचा विषय असो कि अध्यात्म...सगळ्यांचच प्रतिबिंब दिसतय. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी प्रत्येक ओवीचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.

सकाये उठुनी रामाच नाव घेऊ
मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ


अखाजीना गाना - आथानी कैरी तथानी कैरी

खान्देशात आखाजीला मुलींना गौराई म्हणुन माहेरी आणले जाते.
गल्लीच्या मधोमध मोठे झोके बांधुन मुली हे गाणं म्हणतात.

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं ||
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं, कसाना बाजार वं||
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं, बांगड्यास्ना बाजार वं ||
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो ||


आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं ||
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं, कसाना बाजार वं||
झुयझुय पानी व्हाय तठे लच्छाना बाजार वं, लच्छाना बाजार वं ||
माय माले लच्छाली ठेवजो ली ठेवजो।।
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो ||

बन्धु मना सोन्याना सोन्याना पलंग पाडू मोत्यान

अहिराणी गाना - डोंगर हिरवा गार

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार !!

चम चम चमके नांदुरी बझार
डोंगर हिरवा गार...
कपाळी कुंकु डोयामा काजळ
मांगमा भरा गुलाल,
माय तुना डोंगर हिरवा गार!

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
जतरा भरनी चैत्र मजार,डोंगर हिरवा गार!

कानमा कुंडल, नाकमा नथनी,
गया मा बांधा तार, माय तुना डोंगर हिरवा गार!
माय तुना हाथमा सोनानी, तलवार डोंगर हिरवा गार!

डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार!
डोंगर हिरवा गार, माय तुना डोंगर हिरवा गार !!

- अहिराणी साहित्य  

१५ मे २०१२

अहिराणीची प्रकाशित पुस्तके





Author : M. S. Naravane
Publication : Palomi Publications, 1997 - 131 pages
लेखक : डॉ. रमेश सूर्यवंशी
प्रकाशक : अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

लेखक : डॉ. रमेश सूर्यवंशी
प्रकाशक : अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

खानदेशातील म्हणी (वर्गीकारानात्मक)
लेखक : डॉ. रमेश सूर्यवंशी
प्रकाशक : अभ्यासिका प्रकाशन, कन्नड

  
लेखक: डॉ.सुधीर देवरे
प्रकाशक:  ग्रंथाली प्रकाशन

‘अहिराणी म्हणी : अनुभवाच्या खाणी’लेखक :
लेखक : प्रा. डॉ. बाळासाहेब गुंजाळ,
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन

अहिराणी वाग्वैभव -अहिराणी म्हणी, वाक्यप्रचार, आन्हे व लोककथा
लेखक: प्रा. अभिमन्यू पाटील 
प्रकाशक: कस्तुरी प्रकाशन

अहिराणी लोकगीतातील लोकतत्व, इहवाद आणि लोकभाषा
लेखक: म. सु. पगारे  

प्रकाशक: प्रतिमा प्रकाशन


अहिराणी म्हणीतील समाजभाषा 
लेखक: म. सु. पगारे  

प्रकाशक: प्रतिमा प्रकाशन


ताई मी कलेक्टर व्हयनु !
लेखक: राजेश पाटील
प्रकाशक: ग्रंथाली

Ethnobotany of Jalgaon District, Maharashtra

लेखक : शुभांगी पवार
प्रकाशक : दया पब्लिशिंग हाउस 

खानदेशातील आहिराणी स्त्री गीते 
लेखक  : उषा सावंत  
प्रकाशक  :प्रतिमा प्रकाशन


 

खानदेशी मांडे


मांडे हा शब्द मी पहिल्यांदा साधारण दुसरी-तिसरीत असताना मराठीच्या पुस्तकात वाचला. मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. वगैरे वाचुन मांडे म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ आहे हे लक्षात आले. पण हा पदार्थ दिसतो कसा, खातात कशाबरोबर इत्यादी प्रश्न मनात उपस्थित झाले. म्हणजे तसे मला तेव्हा जिलेबी, पुरणपोळी इत्यादी पदार्थही कसे दिसतात ते माहित नव्हते. पण ते शब्द कानावरुनही गेले नव्हते, त्यामुळे अर्थात दिसतात कसे हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता.
मग काही दिवस मी आईच्या मागे भुंगा लावुन दिला, 'मांडे म्हणजे काय ते मला सांग.' आता आंबोलीसारख्या खेड्यात राहणा-या माझ्या आईनेही मांडे कधी ऐकले नव्हते. ती मला काय सांगणार कप्पाळ??!! तिला फक्त तांदळापासुन बनवण्यात येणारे पोळ्या, खापरोळ्या, शिरवाळ्या इत्यादी पदार्थ माहित होते. शेवटी तिने मांडे हे आंबोळीसारखेच असतात असे मला सांगुन स्वतःची सुटका करुन घेतली. सगळे जग तांदुळमयच आहे यावर माझा तेव्हा खुपच विश्वास होता, त्यामुळे मीही मांडे हा आंबोळीसारखा दिसणारा, तांदळापासुन बनवलेला काहीतरी गोड गोड पदार्थ आहे असा माझा समज करुन घेतला. कालांतराने मी हे सगळे विसरुनही गेले.

लग्नातील गाणी




सोनानी कुदाई रुपानं दांड, रुपानं दांड
खंदानी खंदा (गावाचे नाव) नी खाण, (गावाचे नाव)नी खाण
(गावाचे नाव)नी खाणनी रेवायी माटी, रेवायी माटी
ती माटी ती माटी तमाणे भरा, तमाणे भरा
तमाणे भरा रुमाले झाका, रुमाले झाका
वाजत गाजत कुमार घरी, कुमार घरी
कुमार भाऊ तु दामेंडा घडी, दामेंडा घडी
घरधनी जागाडे मायन्या बहिणी, मायन्या बहिणी
मायन्या बहिणी तुम्ही रांधाले इंगा, रांधाले इंगा
आणानी आणानी गंग्यानं पाणी, गंग्यानं पाणी
कणीक भिजील्या डाबान्या वाणी, डाबान्या वाणी
लोयाच भरील्या निंबुन्या फोडी, निंबुन्या फोडी
खिरच रांधिली कापुरना डेरा, कापुरना डेरा
भातच रांधिला मोगरान्या कया, मोगरान्या कया

१४ मे २०१२

बहिणाबाईन्या कवितास्ना संग्रह

बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई चौधरी (१८८०- ३ डिसेंबर, १९५१) ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील)
असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या. लिहीता न येणार्‍या
बहिणाबाई 'अहिराणी' बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी
त्या कागदावर लिहून ठेवत.
त्यांच्या कविता मराठी-अहिराणी साहित्यातील अनमोल साठा आहे.


बहिनाबाईन्या कवितास्ना संग्रह

अरे संसार संसार...
 
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,

 आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर!

अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नहीं, 

राऊळच्या कळसाले लोटा कधी म्हनु नहीं

अरे संसार संसार नहीं रडन कुढ़न, 

येड्या गयातला हार म्हनू नको रे लोढ़न!

अरे संसार संसार खीरा येलावरचा तोड,

 एक तोंडामधि कडू, बाकी अवघा लागे गोड..

अरे संसार संसार, म्हनू नको रे भिलावा,

 त्याले गोड भिमफूल, मधि गोडम्ब्याचा ठेवा.

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे, अरे वरतून काटे,

 मधी चिकने सागरगोटे

ऐका, संसार संसार दोन्ही जीवाचा ईचार, 

देतो दु:खाले होकार, अन सुखाले नकार..

देखा संसार संसार, दोन्ही जीवाचा सुधार,

 कधी नगद उधार सुखा दु:खाचा बेपार

अरे संसार संसार असा मोठा जादूगार,

 माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार

असा संसार संसार आधी देवाचा ईसार,

 माझ्या दैवाचा जोजार मंग जीवाचा आधार..!



राजा शेतकरी

जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी
कारामधी रोखठोक नही उसनउधारी दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी
असा राजा शेतकरी चालला रे आढवनी देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी
बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली पोर्‍हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली
हाया समोरची शाया पोर्‍हं शायीतून आले हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले
अरे असोद्याची शाया पोर्‍हं शंबर शंबर शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर
इमानानं शिकाळती तठी 'आबा' मायबाप देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी माप


अरे रडता रडता
अरे रडता रडता डोळे भरले भरले
 
आसू सरले सरले आता हुंदके उरले 

 
आसू सरले सरले माझा मलेच इसावा 

 
असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा

सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
 झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली


देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा

डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा
रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं

आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव

कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन

तेच देइल देइल नशिबले आवतन
जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत

तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत

नका नका आया बाया नका करू माझी कीव

झालं माझं समाधान आता माझा मले जिव


कशाले काय म्हनू नही

बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही, नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही, नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही, आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही, धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही, जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही, एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही, जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही, जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही, ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही

माहेर

 बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरी

दारी खेटराची रास घरीं भरली कचेरी


गांवामधी दबदबा बाप महाजन माझा

त्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा

माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली

आम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली


तुझे भाऊ देवा घरीं नहीं मायबाप तुले

तुले कशाचं माहेर लागे कुलूप दाराले


भाऊ 'घमा' गाये घाम 'गना' भगत गनांत

'धना' माझा लिखनार गेला शिक्याले धुयांत


आम्ही बहीनी 'आह्यला'  'सीता, तुयसा, बहीना'

देल्या आशीलाचे घरीं सगेसाई मोतीदाना


लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल

माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल


जीव व्हती लाही लाही चैत्र वैसागाचं ऊन

पाय पडतां 'लौकींत' शीन जातो निंघीसन


तापीवानी नही थडी जरी वाहे थोडी थोडी

पानी 'लौकी'चं नित्तय त्याले अम्रीताची गोडी


माहेरून ये निरोप सांगे कानामंधि वारा

माझ्या माहेराच्या खेपा 'लौकी' नदीले विचारा !




घरोट
देवा, घरोट घरोट तुझ्या मनांतली गोट

सर्व्या दुनियेचं पोट घरीं कर्माचा मरोट

अरे, घरोट घरोट वानी बाम्हनाचं जातं,

कसा घरघर वाजे त्याले म्हनवा घरोट

अरे, जोडतां तोडलं त्याले तानं म्हनू नहीं

ज्याच्यांतून येतं पीठ त्याले जातं म्हनूं नहीं

कसा घरोट घरोट माझा वाजे घरघर

घरघरींतून माले माले ऐकूं येतो सूर

त्यांत आहे घरघर येड्या, आपल्या घराची

अरे, आहे घरघर त्यांत भर्ल्या आभायाची

आतां घरोटा घरोटा दयन मांडलं नीट

अरे, घंट्या भरामधीं कर त्याचं आतां पीठ


चाल घरोटा घरोटा तुझी चाले घरघर

तुझ्या घरघरींतून पीठ गये भरभर

जशी तुझी रे घरोटा पाऊ फिरे गरगर

तसं दुधावानी पीठ पडतं रे भूईवर


अरे, घरोटा घरोटा तुझ्या माकनीची आस

माझ्या एका हातीं खुटा दुज्या हातीं देते घांस

अरे, घरोटा घरोटा घांस माझा जवारीचा

तुले सनासुदी गहूं कधीं देते बाजरीचा


माझा घरोट घरोट दोन दाढा दोन व्होट

दाने खाये मूठ मूठ त्याच्यातून गये पीठ

अरे, घरोटा घरोटा माझे दुखतां रे हात

तसं संसाराचं गानं माझं बसते मी गात


अरे, घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी

तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटीं

दाने दयतां दयतां जशी घामानं मी भिजे

तुझी घरोटा घरोटा तशी पाऊ तुझी झिजे


झिजिसनी झिजीसनी झाला संगमरवरी

बापा, तुले टाकलाये टकारीन आली दारीं ! 
 

 धरीत्रीच्या कुशीमधीं

धरीत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं

व-हे पसरली माती जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले व-हे

गह्यरलं शेत जसं अंगावरतीं शहारे


ऊन वा-याशीं खेयतां एका एका कोंबांतून

पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं

जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी


दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी

आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी

कसे वा-‍यानं डोलती दाने आले गाडी गाडी

दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी ! 


पेरनी

पेरनी पेरनी आले पावसाचे वारे बोलला पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी आता मिरुग बी सरे. बोलेना पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!
पेरनी पेरनी अवघ्या जगाच्या कारनी. ढोराच्या चारनी, कोटी पोटाची भरनी.


मन वढाय वढाय
 
मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर,

किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर...

मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा

जशा वा-यान चालल्या पान्यावरल्या रे लाटा

मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोनं?

उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर

आरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर !

मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू बात

आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात..

मन चप्पय चप्पय त्याले नहीं ज़रा धीर

तठे व्हईसनी ईज आलं आलं धर्तीवर

मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना

मन केवढ केवढ? आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन आसं नाही दुनियात

आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत!

देवा आसं कसं मन आसं कसं रे घडलं?

कुठे जागेपनी तूले आसं सपन पडलं!  


खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !
पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला,
 तिचा पिलामधी जीव झाडाले टांगला !
सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर,
 तिले जल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर!
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा,
 पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ,
 तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं!!


 जीव

जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला' जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'
दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली मरणाची नीज जाता जलमाची जाग आली
नही सरलं सरलं जीव तुझ येन जान जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन
आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!
येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप काम करता करता देख देवाजीच रूप
ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं? देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन
अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा
हास हास माझ्या जीवा असा संसारात हास इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास
जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाच उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं


इठ्ठल मंदीर
माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर
टाय वाजे खनखन मुरदुंगाची धुन तथे चाललं भजन गह्यरी गह्यरीसन
टायकर्‍यांचा जमाव दंगला दंगला तुकारामाचा अभंग रंगला रंगला
तुम्ही करा रे भजन ऐका रे कीर्तन नका होऊं रे राकेस सुद्ध ठेवा मन
आता सरला अभंग चालली पावली जे जे इठ्ठल रखूमाई ईठाई माऊली
शेतामंदी गये घाम हाडं मोडीसनी आतां घ्या रे हरीनाम टाया पीटीसनी
उभा भक्तीचा हा झेंडा हरीच्या नांवानं हा झेंडा फडकावला झेंडूला बोवानं
आतां झाली परदक्षीना भूईले वंदन हेचि दान देगा देवा आवरलं भजन
आतां फिरली आरती भजन गेलं सरी बह्यना देवाचीया दारीं उभी क्षनभरी


माझी माय सरसोती
माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
आरे देवाचं दर्सन झालं झालं आप०सुक हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
फुलामधी समावला धरत्रीचा परमय माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!


अश्शि कश्शि येळि वो माये 

आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?


बारा गाडे काजळ कुंकू पुरल नहीं लेनं

साती समदुराचं पानी झालं नही न्हानं

आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?


धरतीवरलं चांदी सोनं डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं तेभी झालं थिटं


आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?


इडा पिडा संकटाले देल्हा तूनें टाया

झाल्या तुझ्या गयामंधीं नरोंडाच्या माया

आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?


बरह्मा इस्नू रुद्र बाळ खेळईले वटीं

कोम्हायता फुटे पान्हा गानं आलं व्होटीं

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?


नशीबाचे नऊ गिर्‍हे काय तुझ्या लेखीं?

गिर्‍ह्यानाले खाईसनी कशी झाली सुखी ?

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?



नऊ झनासी खाउन गेली सहज एक्या गोष्टी

दहाव्याशी खाईन तेव्हां कुठें राहिन सृष्टीं

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?


मानूस  

मानूस,
मतलबी रे मानसा,

तुले फार हाव

तुझी हाकाकेल आशा

मानसा मानसा,

तुझी नियत बेकार

तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर

भरला डाडोर

भूलीसनी जातो सूद

खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध

मतलबासाठीं

मान मानूस डोलये

इमानाच्यासाठीं

कुत्रा शेंपूट हालये

मानसा मानसा,

कधीं व्हशीन मानूस

लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !


करमाची रेखा

[खालील कविता वैधव्य आल्यावर नशीबावर लिहिली]
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ

हिरीताच देन घेन

नको लागू जीव, सदा मतलबापाठी,
हिरीताच देन घेन नाही पोटासाठी

उभे शेतामधी पिक
ऊन वारा खात खात
तरसती केव्हा जाउ,
देवा, भुकेल्या पोटात,

पेटवा रे चुल्हा आता, मान्डा ताटवाटी,
नको लागू जीवा सदा मतलबापाठी

पाहीसनी रे लोकाचे,
यवहार खोटे नाटे

तव्हा बोरी बाभयीच्या
आले आन्गावर काटे

राखोयीच्यासठी झाल्या शेताले कपाटी,
नको लागू जीवा सदा मतलबापाठी

किती भरला कनगा
भरल्यान होतो रिता
हिरिताच देन घेन
नही डडोरा करता

गेली देही निन्धीसनी नाव रे शेवटी
नको लागु जीवा सदा मतलबापाठी


वाटच्या वाटसरा

 वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
नशीबी दगड गोटे
काट्या कुट्याचा धनी
पायाले लागे ठेचा
आलं डोयाले पानी

वरून तापे उन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फ़ोड आले रे पायी

जानच पडीन रे
तुले लोकाच्यासाठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट

उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखात
रमव तुझा जीव
धीर धर मनात

उघडू नको आता
तुझ्या झाकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

' माझेज भाऊबंद
घाईसनी येतीन !'
नको धरू रे आशा
धर एव्हढं ध्यान

तुझ्या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव

मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी
चुकू नको रे वाट

दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट किती

येऊ दे परचिती
काय तुझ्या ललाटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी


माझी मुक्ताई

माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साच लेकरू
चान्गदेव योगियान
तिले मानला रे गुरू

देख ग्यानियाच्या राजा,
आदिमाया पान्हावली
सर्व्याआधी रे मुक्ताई
पान्हा पियीसनी गेली..

अरे सन्याशाची पोर
कोन बोलती हिनई
टाकीदेयेल पोरान्च
कधी तोन्ड पाहू नही..

अरे अस माझ तोन्ड
कस दावू मी लोकाले?
ताटी लावी ग्यानदेव
घरामधी रे दडले !

उबगले ग्यानदेव
घडे असन्गाशी सन्ग,
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभन्ग..

घेता हिरीदाचा ठाव
ऐका ताटीचे अभन्ग
एका एका अभन्गात
उभा केला पान्डुरन्ग..

गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसन
असा भाग्यवन्त भाऊ,
त्याची मुक्ताई बहीन...

- अहिराणी साहित्य (भरत पवार)

अहिराणी लोकगीते - मि त गयतु ना गयतु सासरवाडी..


मि त गयतु ना गयतु सासरवाडी..
तठली गंम्मत गंम्मत ऐका थोडी.
सासरा उना मना फ़िरी फ़िरी फ़ारी..
माले देखताच देखताच राम राम ठोकि.
मि त गयतु ना गयतु सासरवाडी..
तठली गंम्मत गंम्मत ऐका थोडी.
साला उना फ़िरी फ़ारी..
माले देखताच देखताच कोंबडा मारी.
मि त गयतु ना गयतु सासरवाडी..
तठली गंम्मत गंम्मत ऐका थोडी.
साली उनी मनी फ़िरी फ़िरी फ़ारी..
माले देखताच देखताच डोया मारी.
मि त गयतु ना गयतु सासरवाडी.
तठली गंम्मत गंम्मत ऐका थोडी.

लग्न पद्धती, चालीरिती, लग्नातील गाणी

खान्देशी लग्नात लगिनघाई लग्नतारखेच्या आठ दिवस आधीपासुन सुरु होते. सुरुवातीला पितरांना मान दिला जातो. ज्या घरी लग्न आहे तिथे आधी पितर व सवाष्ण जेऊ घातले जातात नंतर देवाचे कार्यक्रम सुरु होतात त्यात पाच सवाष्णींनी मिळुन गव्हाची रास पुजणे नंतर पाच सवाष्णींच्या हस्ते हळद फोडणे, खंडोबाचे अष्टीवर जेऊ घालणे, सोनाराकडे दिलेले देव आणण्यास वाजत गाजत जाणे(हे बहुधा वराची / वधुची बहिणे मेव्हणे जातात), कुलदेवतेचा कुळाचार म्हणजे कुळधर्माच्या आरत्या इ., देवांना आमंत्रण, तेलन पाडणे, लग्नाच्या हे विधी अगदी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत होतात.
या प्रत्येक विधीच्या वेळेस बायका गाणी म्हणतात. एक वयस्क बाई आधी एक ओळ म्हणते, तिच्या मागुन सगळ्या बायका कोरस धरतात. खाली मी एकेक गाणं आणि त्यांचा जरुर तिथे अर्थही देत आहे.

 हळद फोडायच्या वेळेस म्हणावयाचे गाणे:

अहिरानी म्हणी

  • घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा
  • चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला
  • दळे तिले कळे, नी फुकटी गोंडा घोळे
  • खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा
  • नवल्यानी घीदी गाय, नी धाई धाई दुध काढले जाय
  • खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी.
  • जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको 
  • चार आनानी पेवाणी, नी बारा आनानी दखाडानि
  • येडी न मत, नी घुबड न चाळा.