०८ जुलै २०१३

अहिराणीला समृद्ध करण्याचा वसा प्रत्येकाने जपावा

नाशिक - अहिराणीएवढा गोडवा इतर भाषांना नाही. जिच्यामुळे आपली जडण-घडण झाली, त्या अहिराणी भाषेला समृद्ध करण्याचा वसा प्रत्येकाने जपला पाहिजे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज येथे केले. चौथ्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज श्री. निकम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार प्रतापदाद सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, आमदार नितीन भोसले, नाना महाले, रवींद्र सपकाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्षा शकुंतला चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. स्वागताध्यक्ष माजी मंत्री रोहिदास पाटील आदींसह विविध मान्यवर या वेळी दा. गो. बोरसे विचारमंचावर उपस्थित होते.

ऍड. निकम म्हणाले, की अहिराणी भाषा चौथ्या शतकापासून प्रचलित आहे. मराठीचा उदय 18 व्या शतकात झाला. मात्र, तिला राजाश्रय मिळाल्याने ती राजभाषा झाली. अहिराणीला ते भाग्य लाभले नाही. या भाषेला जो गोडवा आहे त्याची सर इतरांना येत नाही. गोव्याच्या कोकणी भाषेला, कोकणातील मालवणी भाषेला बोलीभाषेचा दर्जा मिळतो. मात्र, अहिराणीला अजून दर्जा मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, की अहिराणी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी विविध साहित्य प्रकाशित झाले पाहिजेत. ज्या भाषेमुळे आपली जडणघडण झाली तिला समृद्ध करण्याचा निर्धार आपण प्रत्येकाने केला पाहिजे.

श्री. भुजबळ म्हणाले, की साहित्यात आता मक्तेदारी राहिलेली नाही. विविध भाषेतील व चळवळीचे साहित्य संमेलने होत आहेत. खानदेशी बांधवांचा आजचा उत्साह पाहिल्यानंतर अहिराणीचेही भवितव्य उज्ज्वल आहे. जगभरात सहा हजार सातशे बोलीभाषा आहेत. त्यातील साडेतीन हजार भाषा शतकाअखेर नष्ट होणार आहेत. त्यामुळे भाषेच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्‍न विविध बोलीभाषांसमोर आहे. अहिराणी भाषा कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी अशा संमेलनांचे नितांत गरज आहे. प्रत्येकाने अहिराणी भाषेत बोलताना लाजायचे सोडले, तर खानदेशी बांधव पहिली लढाई जिकल्यात जमा होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यापुढे खानदेशी माणसाशी बोलताना अहिराणीत बोलावे. नेहमी भाषेचा अभिमान बाळगावा, अशी सूचना त्यांनी केली. उषा सावंत यांनी प्रास्ताविक केले. रोहिदास पाटील यांनी स्वागत केले. अहिराणी भाषेतील लोकगीतातून उपस्थितांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर उज्ज्वल निकम यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी माजी मंत्री दौलतराव आहेर, डॉ. शोभा बच्छाव, मंजुळा गावित, साहेबराव पाटील, गुलाबबापू पाटील, सुभाष देवरे, लता पाटील, सुभाष अहिरे, रमेश वरखडे, अशोक धिवरे, रमेश सूर्यवंशी आदींचा सत्कार करण्यात आला. के. डी. पाटील यांनी आभार मानले. 
Reference from Sakal : December 04, 2011 AT 04:00 AM (IST)

- अहिराणी साहित्य  

१४ ऑक्टोबर २०१२

डुबुकवड्यांची मसालेदार आमटी!







लागणारे जिन्नस: 

मसाल्यासाठी:
मिरे: ८-१०
लवंगा-५-६
दालचिनी- २-३
मसाला वेलदोडा_ ३
चक्रफुल- ४
लाल तिखट- २ मध्यम आकाराचे चमचे
गरम मसाला असल्यासः २ चमचे
सुके खोबरे: अर्धी वाटी
कांदे: मध्यम आकाराचे ३
लसुणः ८-१० पाकळ्या
आलं- बोटाच्या पेराएवढं
मीठः आवडेत तितकं
डुबुकवड्यांसाठी:
बेसनः एक मध्यम आकाराची वाटी भरुन
मीठः चवीपुरते
लाल तिखटः आवडत असल्यास १ छोटा चमचा
हळदः किंचित
ओवा: भजीच्या पीठात घालतो तशा
क्रमवार पाककृती: 
मसाल्याची आमटी:
कांदे चिरुन तव्यावर थोड्या तेलावर लालसर भाजुन घ्यावे किंवा तसाच कांदा गॅसवर भाजला तरी चालेल. सुकं खोबरं काप करुन तेही तव्यावर थोड्या तेलात लालसर भाजावे.
लवंग मिरे, दालचिनी, चक्रफुल, मसाला वेलदोडा सर्वच तव्यावर भाजुन घ्यावेत.
आणि आता हे सर्व लाल तिखट, घरचा तयार गरम मसाला असेल तर त्यासहीत मिक्सरमधुन बारीक करावेत.
कढईत तेल घेउन तेल तापले की छोटा चमचाभर बेसन तेलात टाकावे. आणि नंतर हा वाटलेला मसाला त्यात घालावा.मसाला तेलात चांगला परतुन घ्यावा. मसाल्याचा वास घरभर पसरला आणि मसाला उलथन्याला

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा

कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा
कोन गाव परनाले जाशी वं मन्हा रसिक राजा ||
काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
घड्याळ बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सानं घड्याळ न कस्सानं काय
डेडोर ( बेडुक??) बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी वं मना रसिक राजा....

काय बांधी उना व मन्हा रसिक राजा
पोयतं बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न पोयत न कस्स न काय
नाडा बांधी उना वं मन्हा रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मन्हा रसिक राजा...

काय बांधी उना वं मन्हा रसिक राजा
बाशिंग बांधी उना वं मन्हा रसिक राजा
कस्सा न बाशिंग नि कस्सा न काय
सुपडं बांधी उना व मना रसिक राजा ||
कोन गाव परनाले जाशी व मना रसिक राजा

- अहिराणी साहित्य

परना - लग्न

अहिराणी गाना - मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

आंग्या पांग्या ना संसार नही कराव माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय !

मी ते शेतकरी नवरा नई कराव माय
यान्हा पायल्या ना भाकरी कोन करी माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं पोलीस भरतार नइ कराव माय
यान्हा पट्टानी पालीस ( पॉलिश) कोन कराव माय
मी ते घागर धरी धरी....!

मी तं मास्तर भरतार नही कराव माय
यान्हा पगारना नोटा कोन मोजी माय
मी ते घागर धरी धरी...!

मी तं साह्येब भरतार करसु वं माय
त्यान्हा गयामां हात घाली फिरसु वं माय
मी ते घागर धरी धरी नाचु वं माय!

- अहिराणी साहित्य 

अहिराणीतील खमंग संवाद!

अहिराणीतील खमंग संवादः
नुकतेच 'मराठी दिनानिमित्त' मायबोली या वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.

 प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे.

त्यातली ही माझी एन्ट्री:

नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी? तिले जास्त टाईम लागस नट्टापट्टाले! काम नैन धाम नै... नुसता नखराच दखा नटमोगरीना!

मोठी जाऊ(नवरीना 'माय'ले): का वं इजु? नवरदेवले ववाळाले ताट लिधं का? त्या मां तुपना दिव्वा लावाले इसरु नकोस बर्का! आन आक्पेटी नेमबंद ठी दे नैतं इसरी जाशी...अन मग तथा बोंब! तुले म्हाईत शे ना 'धल्ला' (धडला- म्हातारा) ना स्वभाव! आन जवाईले ववाळशी तव्हय डोक्यावर पदर घे जो!

नवरीनी मायः हां वं बाई! माले म्हाईत शे ना! ह्ये का पह्यलं लगन शे आपल्या घरमां...

एक करवली (मुसमुसत): वं माय मी आते काय करु? मन्ही नथ नई सापडी राह्यनी! कालदिन देव आणाले गयथु तव्हय तं व्हती नाकमां …
 

१८ मे २०१२

अहिराणी लोककथा - लक्षुमी आन अवदसा

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.
लक्षुमीनं घर मोठं-शिरीमंत, एकत्र कुटुंब. मोठी शेतीवाडी, डाळिंबना बागं आन द्राक्षास्ना मळा. रामपारात उठीसन लक्षुमी कामले लागे. दारना आडे ठेयेल कुंचा काढीसन सरं घर झाडे. आंगनमा सडारांगोळी काढे. मंग सरास्ले न्ह्यारी आन पोर्‍यास्नी तयारी. मंग दुपारनं जेवण. मंग धान्य पाखडनं, निवडनं, सुनं. मंग सैसानले दळा-भयडाना-पाखडाना कामं. रातना सयपाक लगेच सुरू. रातपावत बिचारी दमे जाये. हाई सरं सासू-सासरा, देर-ननंदा, नवरा-सालदारं-गडीमान्सं.. सरास्ले समजे. घरनास्ना दोन गोड शब्द मिळनात, नवराकडतीन गोड इचारपूस व्हयनी, का मंग तिले कयेल कामनं काईच वाटेना. शांत झोप लागनी, का मंग दुसरा दिवस रामपारात उठाले बळ येये. इतला मानसं र्‍हाईसनबी या घरात भांडन-कजा व्हयेना. सरा आनंदीआनंद आन गोकूळनं राज्य.

 अवदसानं सरंच उलटपाल्टं. कासराभर ऊन येयेस्तोवर झोपी र्‍हाये. काम करानी सवयच नव्हती. आन गंदाबुरा विचारस्मातून सवडबी नव्हती तिले. कुंचाबी हातमा धरता येयेना, ते काम कसाले सांगी कोन..? चुकीमाकी कोनी सांगंच, ते वाचाळ तोंड करे सर्रास्वर. तिले घाबरीसन कटकट नको, म्हनीसन सरा लोक आपापला कामं करी लेयेत. पन इतलं राबीसनबी त्यास्ले मळा फळेना, खडकू मिळनात.
लक्षुमीना घर पैसास्ना पाऊस, आन लक्षुमी दागिनास्नी मढेल. अवदसाले हाई काई बरं वाटेना. दिनभर लक्षुमीवर जळी र्‍हाये. डोकं चालाडी पार थकी गयी ती, पन यावर तिले इलाज सापडेना.
अवदसानासारखीच तिनी ननींद. एक दिन ननींद तिले बोलनी- लक्षुमीना घरमा भांडनकजा घालूत. हाऊ एकच रस्ता शे घर बिगाडाना. तिना घरमा घुसानं सादंसोपं नई. त्यानाकरता एक काम तुले करणं पडी. नीट आयक. लक्षुमीना घरना कुंचा कायम दरूजाना आड दडेल र्‍हास. तो कुंचा जवळ बाहेर पडेल दखायना, तवळ त्यावात तू जाय. आन सरं घर झाडीसन त्यास्ले उलटंपालटं करी टाक. तिना घरमा घुसाना, घरना पूरा बारा वाजाडाना हाऊ एकच रस्ता शे.

बहिणाबाई

बहिणाई

 

 “माझी माय सरसोती, मले शिकवते बोली”

“स्वतंत्र भारती अता, तुझेच रुप पाहू दे…
जुने पणास त्याजिता, वसुंधरा नवी कळा
मनामनात आगळ्या नवीनता समावुदे !!
दिवाकरा, मिषे तुझीच दिव्य दर्शने किती
कणाकणातली श्रुती जनाजनात ते नेऊ दे !!
नभी दयार्द्रता तुझी. धरेत नित्य पाझरे
परात्परा असाच रे, झरा अखंड वाहू दे !!

किती साधे शब्द, किती साधी रचना.. पण चराचराचं कल्याण मागणारी रचना ! जणू ज्ञानदेवाने मागितलेल्या पसायदानाचा उत्तरार्धच ! साधेपणा या माणसाच्या लेखनातच नव्हे तर स्वभावातही काठोकाठ भरलेला होता. कुठून आला असेल हा विलक्षण साधेपणा, ही विलक्षण प्रतिभा या माणसामध्ये!

अहिराणी गाना - बोली मनी अहिराणी

बोली मनी अहिराणी,

जशी दहिमान लोणी


सगया ताकना पारखी,


इले पारख नही कोणी


बोली मनी अहिराणी,


जशी दहिमान लोणी 


पंढरपुरले बाई वैसाले माली इस


हाथ मना पुरेना इठूला खाल बस  


- अहिराणी साहित्य


१७ मे २०१२

कानुबाई पिवळा पीतांबर नेसणी ओ माय!


श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

१६ मे २०१२

अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह!!!

जात्यावरल्या अहिराणी भाषेतील ओव्यांचा खजिना आज तुमच्यापुढे खुला करत आहे. खरतर सुमारे २ वर्षापुर्वीच हा माझ्या हाती आला होता. हे मला ज्यांच्याकडुन मिळाले त्यांच्यापैकी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी आत्या विमलबाई दुसाने या आता हयात नाही (जाने.२०११ मधेच त्यांचे निधन झाले) दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे मला इथे मांडता आलं नाही....काही काही सल आयुष्यभर रहातात. हेच खरं अरेरे .. तरीसुद्धा ही त्यांना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली. दुस-या म्हणजे माझ्या मोठ्या काकु प्रमिला वानखेडे आणि माझी आई विजया वानखेडे यांच्या पाठगुळी बसुन मी हे सगळं लिहुन घेतले होते. त्यांचीही मी ऋणी आहे.

त्यांच्याकडुन जी माहिती प्राप्त झाली ती याप्रमाणे:
पुर्वी लहानपणीच मुला-मुलींची लग्न होत असल्याने सासु-सुन किंवा सासुरवास अशा गोष्टी या ओव्यांमधुन दिसत नाही. हं...मधुनच जावा-जावांचे खटके किंवा नणंद-भावजयांचे टोमणे जाणवतात. माझी आई तर नेहमी म्हणे : अगं आधी आईच्या हाताखाली सुन म्हणुन रहावं लागतं नंतर सासुच्या! पहाटे नणंद भावजयी दोघींनाही पहाटे उठुन जात्यावर ४-४ शेराचं (म्हणजे ८ किलो/पायलीभर) दळण करावं लागे. आधी घट्याची/ जात्याची हळद-कुंकु वाहुन पुजा करण्यात येइ. एवढं दळण दळतांना गाण्यात येणा-या ओव्यांमधे काही परंपरागत तर काही लगेच सुचलेल्या ओव्यांचा समावेश असे. मग त्यात नणंद-भावजयींचे खटके असो, त्या त्या काळातली परिस्थिती असो, माहेरासारखा जिव्हाळ्याचा विषय असो कि अध्यात्म...सगळ्यांचच प्रतिबिंब दिसतय. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी प्रत्येक ओवीचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.

सकाये उठुनी रामाच नाव घेऊ
मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ


अखाजीना गाना - आथानी कैरी तथानी कैरी

खान्देशात आखाजीला मुलींना गौराई म्हणुन माहेरी आणले जाते.
गल्लीच्या मधोमध मोठे झोके बांधुन मुली हे गाणं म्हणतात.

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं ||
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं, कसाना बाजार वं||
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं, बांगड्यास्ना बाजार वं ||
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो ||


आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं ||
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं, कसाना बाजार वं||
झुयझुय पानी व्हाय तठे लच्छाना बाजार वं, लच्छाना बाजार वं ||
माय माले लच्छाली ठेवजो ली ठेवजो।।
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो ||

बन्धु मना सोन्याना सोन्याना पलंग पाडू मोत्यान