१५ मार्च २०१८

अहिराणी भाषेचा इतिहास


"अहिराणीभाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहेहि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहेपरंतुआता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेतविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेतअहिराणी आता काही खान्देश वासींना आवडत नाहीआणि या भाषेला तर आता "मृत भाषाम्हणून घोषित करण्यात आले आहेम्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा . 
  
मंडळीअहिराणी भाषा म्हणजे श्री कृष्णदेवांचा आशिर्वाद आहेमहाभारतात खान्देशावर एक कथा आहेश्री कृष्णदेव आणि जरासंध यांच्यात चौदा वेळा युद्ध झालेतेरा वेळा श्री कृष्णदेवांचा विजय झालाचौदाव्या युद्धात मात्र जरासंधाला विजय मिळाल्यावर जीव वाचवण्यासाठी देव मथूरेहून द्वारकेला पळालेम्हणून त्यांस "रणछोडदासअसे म्हणतात 

हे रणछोडदास द्वारकेकडे जात असतांना रस्त्यात खांडव वन लागलेइथे त्यांनी काही वर्षे मुक्काम केलाते पशूपालांचा राजा असल्यामुळे त्यांच्या सोबत असंख्य मेढपाळ  गोपाळांचा समूह होताखांडव वनात चारा पाणी भरपूर होतेमैलोनमैल जमीन होतीया ठिकाणी हे पशूपाल खुपच रमले. 

या पशूपालांना "अहिरम्हणतआणि त्यांची बोलण्याची भाषा म्हणजे "अहिराणीभाषा होय 

पुढे द्वारकेच्या दिशेने जायचे ठरल्यावर काही लोकांनी नकार दिलाकृष्णदेवांच्या संमतीने त्यांनी खांडव वनातच वसाहत निर्माण केलीआपल्या लाडक्या राजाचे नाव या प्रदेशाला दिलेकन्हैयाचा कान्हदेशपुढे याच कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश असा झाला 

या कान्हदेशाची राजधानी नंद राजाच्या नावावरून वसवलीतिचे नाव नंद दरबार  पुढे याचा अपभ्रंश नंदुरबार असा झाला .  

खान्देशात महाभारतातील कौरवपांडवाच्या नावावरून तर भरपूर गावे आहेत. 

आणि ती पुढीलप्रमाणे : - 

 नन्द राजाच्या नावावरून नंदान  
 धर्म च्या नावावरून धमानं  
 भीमच्या नावावरून बामनं  
 अर्जुन च्या नावावरून जूनून  
 जयद्रथ च्या नावावरून जैतान  
 श्रीधर च्या नावावरून शिरधार  
 मुकुंदा च्या नावावरून कुंडान  
 गोविन्दा च्या नावावरून वैदान  
 अस्वत्थामा च्या नावावरून आस्तान 
 बलराम च्या नावावरून बळसान 
 दुशासन च्या नावावरून दूसान 

अशा प्रकारची नावे गावांची आहेत  त्या समोर त्यांची अपभ्रंश झालेली नाव आहेत तर काही नाव जशीच्या तशी आहेत. 

श्रीकृष्णाचा चुलता म्हणजे उध्दवाचे वडिल देवभान हे नाव जसच्या तस एका गावाच आहे 

भगवान श्रीकृष्णाच्या धनुष्याच नाव सारंग धनुष्य होतेया नावाच गाव दोंडाइचे आणि शहाद्याच्या मधे तापीच्या काठावर आहेयाच जागी भगवान श्रीकृष्ण धनुष्य बाणाचा सराव करायचा त्याच मैदानात त्याने नारायणी सेना घडवीली.त्या जागेवर जे गाव वसले त्याच नाव "सारंगखेडा" ! या ठिकाणी महानुभाव पंथियांचा दत्त आहे त्याची मोठी यात्रा भरतेतो त्रिमुखी दत्त नसून एकमुखी दत्त म्हणजेच दत्तात्रय ! 

प्रभु म्हणजेच श्रीकृष्ण ! श्रीकृष्णाची जात अहीर होतीअहीर म्हणजे गवळी ! हे अहीर लोक जी भाषा बोलतात ती अहिराणी ! अहिरांची भाषा ती अहिराणी 

अशी ही श्रेष्ठ अहिराणी भाषाया अहिराणी भाषेवर आणि खान्देशावर कितीही लिहिले तरी कमीच आहेकारण कीहि एक वीरांची भूमी आहेया भूमीवरती शूरवीर जन्माला आलेआणि या भूमातेला आणखीन पवित्र केले 

भक्तप्रल्हादबळीराजासितेची आबरू वाचवण्यासाठी बलिदान करणारा घृधराज महाबली जायल(जटायू). अर्जूनापेक्षाही वरचड असलेला धनुर्धारी निषाध राजा एकलव्यरामभक्त शबरी भिल्लिणदरभंग रूषीपवनपुत्र हनुमान ही सर्व मंडळी खान्देशी होती 

महाराष्ट्राबाहेर मराठी साम्राजाचा विस्तार करणारे लढवय्ये खान्देशीच आहेतइंदूरचे मल्हारराव होळकर तळोदयाचे होतेबुंदेल खंडाची राणी लक्ष्मीबाई झांसीवाली पारोळ्याची कन्या होतीबडोद्याचे दानशूर राजे सयाजीराव गायकवाड कौळाणे (मालेगावयेथील होतेअहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे घेता येतील 

राम रावण युद्धात न्यायाच्या बाजूने लढतांना पहिला बळी जटायूंच्या नावाने जसा खान्देशी माणसाचा गेलाअगदी तसेच बलिदान ब्रिटीशांविरोधात लढताना खान्देशी लोकांनी केलेब्रिटिश सत्ते विरूध्द स्वातंत्र्य युद्ध पेटवून ब्रिटिशांची पहिली गोळी छातीवर झेलणारी झाशीची राणी जशी होती तशी या युद्धात शेवटची गोळी छातीवर झेपणारा वीर बालक शिरीष कुमार खान्देशी होता. 

अशा या पावन भूमीवर महान अहिराणी भाषिक होऊन गेलेखाज्या नाईक (शिरपूरसेंधवा), महाराजा सयाजीराव गायकवाड (कवळाणे), रा..गडकरी (गणदेवी), विकाराजवाडे (धुळे), महादेव गोरानडे (निफाड), डॉक्टरउत्तमराव पाटील (डांगरी), डॉलिलाताई पाटील (डांगरी), बहिणाबाई चौधरी (असोधा), पांसाने गुरुजी (अमळनेर),भाऊसाहेब हिरे (दाभाडी), .ना.चौधरी (फैजपूर), ..माळी गुरूजी (शिरपूर), शिरीष कुमार मेहता (नंदुरबार), दादासाहेब गायकवाड (आंबे-दिंडोरी), श्री.डांगे (करंज), दादासाहेब फाळके (नाशिक), विवाशिरवाडकर (नाशिक), तर्कतिरथं लक्ष्मणशास्त्री जोशी (पिंपळनेर), लताताई मंगेशकर (थाळनेर),तंटया भिल्ल (रावेर-बरहाणपुर).हे खान्देशातील माणिकमोतीया बरोबरच आणखीन भरपूर अहिराणी माणिकमोती आहेत 

परंतुआज याच अहिराणी मातेवरती खुप वाईट दिवस आले आहेतआज तिच्याच काही पुत्रांना जन्मभूमी बद्दल ज्ञान नाहीअतिशय मायाळू असणार्‍या या आईचे तिचेच काही पुत्र तिरस्कार करत आहेत 

मंडळीभाषा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतातआणि तिचाच आज नकार करणे हे चुकीचे आहेआणि ते ही आपल्या अहिराणी भाषेचे. 

आज अहिराणीला वाचवणे ही काळाची गरज आहेकारण अहिराणी गेली कीसगळेच संपेलआपले अस्तित्व ही संपेलकारण ही महाराष्ट्रात मराठी भाषेसारखीच पवित्र भाषा आहेम्हणूनच या भाषेला जिवंत ठेवायला हवेतिचा आदर करायला हवेअहिराणीच काय प्रत्येक भाषेचा मानवाने आदर करायला हवा.. 

मना गाव... मना देश... खान्देश

रामायण गड्या हो असं घडनं..


०१ ऑगस्ट २०१७

दुनियादारी

गावं तुम्हन ..! दादा भलतं जहरी शे
करतसं गुन्हा राजरोस तरी नैयी देखत कोणी,..दुनिया सारी अंधी बहीरी शे....
अब्रु लुटास भरे बजार माय माऊली नी
जठे तठे सैतानस नं राज शे....;
भेटस का कोठे..? न्याय मोठ्ठला मोर्चा
काढीसनी...! ,समदा मतलब ना चोर सेत.
रोज मरी रहायना शेतकरी कर्ज बजारी
व्हयीसन कोणले त्यान्हा मरणन मोल शे.. ;
त्या काढी रहायनात रोज ए.सी. गाडी म्हा बसीसन शिवार फेर्या , यास्ले शेती मधलं काय तित्तुर कयनार शे..
डल्ला मारी रहायनात त्या गरीब नी थाटी म्हा त्यान्हा परीस कुत्रं बरं शे..;
कोणी रहायनं नयी गरीबना वाली
आठे मरणं पेक्षा जगणं महाग शे...
आठे मरण पेक्षा जगणं महाग शे..

 जयराम सिताराम मोरे
एकलव्य चौक सोनगीर ता.जि धुळे .


देसप्रेमी माय

देसप्रेमी माय 
उठ उठ सुनबाई ल्हेव आरतीनं ताट ;
आज लढाई वर निंघना तुन्हा पतीराज..
नको बसु कोपराम्हा तु अशी रडीकुढी,
लाज भारतमायनी राखाले निंघेल से
हाऊ विर गडी...
व्हत कुंकू कपाय नं मन्ह
देश ना काम ले उन ;
हायी तेन्हच से रगत कशी बुडायी,
कुळ नी शान ...
शे एकुलता एक लाल मन्हा ,
जिव मन्हा बी तुटसं ;
पण..! सेवा जन्म भु नी कराले
मोठ्ठ भाग्य लागस...
कर भरजरी सोया  सिंगार
जसं भवानी नं रुप....;
हासी सन काढ ईडापिडा,
तेल्हे लढाले य्हीन हूरुप..
करीसन आकांत तोडु नको
त्यान्ही हिम्मतं...
उपकार धरत्रीना फेडाले त्याल्हे
मोजानी से किंमतं..
पडनी से देस वर दुश्मन वैरी नी नजर ;
कालीज तेन्ह आणिन  चिरीसन
मन्हा शुर सरदार..
म्हणु दे दुनिया ले आपुनले करंट्या ; हारना मन्हा लेक ते लढाई वर जासुत आपण दोन्ही स्वःत्या...

 जयराम सिताराम मोरे
एकलव्य चौक सोनगीर ता.जि धुळे .